वन बुलढाणा मिशनच्या 'जाहीरनामा जनतेचा' अंतर्गत आज टाकळी विरो (ता. शेगाव) येथे संवाद सभा झाली.

वन बुलढाणा मिशनच्या 'जाहीरनामा जनतेचा' अंतर्गत आज टाकळी विरो (ता. शेगाव) येथे संवाद सभा झाली. ग्रामस्थांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक, माता- भगिनी, युवक एवढेच काय तर बालगोपालांनी मनापासून स्वागत केले. सर्वांच्या प्रेमाने मी भारावलो. परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होणाऱ्या सर्वांचे आभार...

संवाद यात्रेअंतर्गत आजची ही दुसरी सभा होती. पहिली सभा ईसोली(ता. चिखली) येथे झाली. तेथील ग्रामस्थांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाकळी विरो येथेही अभूतपूर्व प्रेम मिळाले. जिल्ह्यातील नागरिकांना परिवर्तन हवंय, विकास हवाय. आता जनता भूलथापांना बळी पडणार नाही.

जनता जनार्दनाने अनेकांना संधी दिल्या. फायदा काय झाला? काहीच नाही. लोकप्रतिनिधींनी भ्रमनिरास केला. साध्या- साध्या प्रश्नांवर सुद्धा कामं केली नाही. त्यामुळे विकासात जिल्हा पिछाडला. येणाऱ्या काळात जनतेने एकच गोष्ट करायचीय. आपण नेत्याच्या वजनाखाली नाही तर नेत्यावर आपले वजन ठेवायचंय. तेंव्हाच विकास शक्य होईल.

मला शेतकऱ्यांच्या बांधावर सिंचन पोचवायचेय. सिंचन असले तरच शेतकरी सुखी होईल. शेतकरी सुखी झाला तर शेतमजूर सुखी होईल. जिल्ह्यात मोठे उद्योग आणायचे आहेत. उद्योग आले तर युवकांना काम मिळेल. हाताला कामे मिळाली तर युवक स्वावलंबी होतील. जिल्ह्यातील जनतेने एकदा संधी द्यावी. त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन, असे आश्वासन दिले. सभेला उपस्थित सर्वांचे मनापासून धन्यवाद मानले...