जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या
अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला.

जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला.

जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोमवारी सकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील असोला, पळसखेड चक्का, बोराखेडी बावरा,सिंदखेडराजा यासह अनेक गावांत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नुकसानाची पाहणी केली.

पळसखेड चक्का या एका गावात शेडनेट लावलेले जवळपास १०० शेतकरी आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेडनेटमध्ये लावलेले टोमॅटो, वांगी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेडनेट उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. राज्य, केंद्र सरकार शेडनेटला नुकसान भरपाई देत नाही. पाच- दहा हजारांचे सानुग्रह अनुदान देऊन जमणार नाही. शेतकऱ्यांना तत्काळ योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

असोला येथील ग्रामकल्याण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे शेडमध्ये ठेवलेले सोयाबीन सीड पावसाने भिजले. तर वादळी वाऱ्यामुळे याच गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. टिनपत्रे उडाल्याने शेतकऱ्यांच्या घरातील कापूस भिजला. किराणा सुद्धा भिजला. त्यामुळे असोला येथील वन बुलढाणा मिशनच्या कार्यकर्त्यांनी काही घरात किराणा सामान किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.